Tuesday, July 9, 2019

वेळेची पहिली वेळ !!!!!!!

Hiii friends , आज पुन्हा हा लेखनाचा इंद्रधनुष्य पेलतोय ,आज हा माझा तिसरा लेख खरंतर आज ही एका गोष्टीची दुसरी बाजू मांडणार आहे.
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची असते . काहीजण ती कटाक्षाने पाळतात तर काही जण तिची आयुष्यात येण्यासाठी वाट पाहतात. काहीजण तिची दुसऱ्यांच्या आयुष्यात येण्यासाठी वाट पाहतात.एक दिवस याच्यावर सुद्धा ही वेळ येईल या सूड बुद्धी ने . अशी ही वेळ .
माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या बाबतीत सगळ्यांचा हाच सूर कायम असतो की हा माणूस कधीही वेळ पाळत नाही . वेळेची काहीही पडलेली नाही . कधीही येतो . असं सहसा प्रत्येक वेळी होतं . आणि माझ्या जवळच्या व्यक्तींनी ते अनुभवलं असेल . खरंतर मी काही अंशी सुद्धा मान्य करेन की मी त्या बाबतीत थोडा कच्चा आहे. पण याच वेळेविषयी मला वेळोवेळी आपुलकी वाटत गेली .म्हणूनच मी आज या वेळेची दुसरी बाजू मांडतो.
हा माझ्या रोजच्या दिवसा सारखाच दिवस होता . आमच्या कॉलेज ला परवा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम होता ज्या साठी कॉलेज ने वर्षभर खूप कष्ट व पैसे खर्च केले यावरून त्याच गांभीर्य लक्षात येत असेल. त्या साठी मी सुद्धा मुंबईतून खास त्या करिता आलो .  सकाळी मी कॉलेज ला गेलो . सर्वांना खूप टेंशन होत .मी गपचूप आमच्या ऑडिटोरिअम गेलो . आणि मला अचानक समजलं की तुला आता मिमिक्री करायचीय ते ही हिंदी मधून . हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यासमोर अख्खा हिंद महासागर उभा राहिला . अचानक सांगितल्या मुळे मी पूर्ण भीतीने खचलो माझी मनस्थिती अजिबात  ठीक नव्हती आणि त्यात माझ्या सादरीकरणाची 2 मिनिटा वरून 8 min झाली. मग मनाला समजावत मी तो परफॉर्म केला . सरांनी आणि मित्रांनी खूप धैर्य दिल.तो माझ्यालेखी  फेल ठरला .करण मी अपेक्षेला अजिबात खरा उतरलो नाही . मी स्टेज वर शेवटचा  धन्यवाद केला आणि विंगेत बसून डोळे मिटले .अजून मनस्थिती खराब झालीहोतो . आणि प्रत्येकाचे चेहरे डोळ्यासमोर यायला लागले .कारण अनेक जणांना मी एक कारण दिल होतं की जे कायम माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उठवतात .मला माहिती होत की माझी क्षमता ही नाहीये पण वेळ ती होतो मी तिला स्वीकारलं आणि कुणाशीही न बोलता शांत डोळे मिटले . तिथून एकटाच बाहेर पडलो न सांगता .सोबत माझा जवळचा मित्र देखील होता. सगळे वर अत्यंत आनंदी होते कारण तो कार्यक्रम अत्यंत मस्त झाला. याच मला सुद्धा समाधान होतं पण मनात ती एक सल मात्र होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती अख्ख कॉलेज वरती सेलिब्रेशन करत होत.आणि एकटा गेट जवळ फिरत होतो .मनाशी सहज म्हटलं चला कॉलेज ची भांडी घासूया म्हणजे तसा वाक्प्रचार आहे माझ्याबाबतीत याचा अर्थ असा की  कॉलेज मधली काम करणे कारण तीच मी 3 वर्ष करत आलो . तेवढ्यात माझ्या पिलणकर मॅडम अत्यंत व्याकुळ पणे माझ्याजवळ आल्या खर तर त्या माझ्या मॅडम कमी आणि माझी मैत्रीणच जास्त होती . त्या म्हणाल्या शैल्या बाबा वेळेवर आलास ,अरे वरती सगळ्यांना खायला द्यायचंय त्याचे   बॉक्स बाजूला ठेवलेत आणि कुणीच फोन उचलत नाहीये मी एकटी काय करू समजत नाहीये सर ओरडतील. मी काही न सांगता हसून कामाला लागलो कारण त्यांची तळमळ मी ही एकेकाळी अनुभवली आहे. मग मी आणि देवा ने सगळ्यांना वरती खाऊ पोचवला . Mam नि नेहमीप्रमाणे हक्काने  खडे बोल सुनावले आणि तितकंच कौतुक देखील केलं . नंतर मी तसाच बाहेर घुटमळत राहिलो करण मॅडम ने अजून दोन लिटर तेल टाकलं .त्या म्हणाल्या शैल्या गोंधळालास ना नेहमी प्रमाणे नाही झाला परफॉर्म.
 मग मी गेट वर होतो तेवढ्यात धावत धावत काही मुलं खाली आली मी म्हटलं काय झालं रे . त्यातला एकजण म्हणाला की अरे दादा याला आत्ताच रक्ताची उलटी झाली आणि हा बेशुद्ध होता स्वतःला आत लॉक केलेलं . डॉक्टर कडे न्यायला हवं. मग लगेच काहीही न बघता त्याला डॉक्टर कडे घेऊन गेलो .करण त्यात कुणीही मोठं नव्हतं सगळे बिचारे लहान होते .आणि सेलिब्रेशन च्या नादात त्याच्याकडे बहुतेक कुणाचं लक्षच गेलं नसेल. मीच त्यात एक मोठा म्हणून मी दवाखान्यात गेलो .
आणि इथून खरी घटना सुरू झाली .
तिथे त्याला ऍडमिट केलं .त्याला चार प्रेमाच्या शिव्या दिल्या  आणि पोत भर कॉन्फिडन्स दिला. अजून तिथे डॉक्टर आले नव्हते आम्ही वाट बघत होतो. केसपेपर वैगेरे सगळं झालं आणि मी त्या गडबडीत डॉक्टर येण्याची वाट पाहत गेट समोर घिरट्या मारत होतो. थोड्यावेळाने भर पावसात धावत पळत  तिथे एक मुस्लिम महिला  तिच्या बाळाला घेऊन रडत रडत   त्या गेट जवळ पोहचली मला कळायला काही मार्गच नव्हता .ती आली आणि हुंदके देत सांगू लागली डॉक्टर मेरे बच्चे को देखो ना प्लीज  बहोत दर्द कर रहा है । मी म्हटलं नेमकं काय झालं  थोडा जवळ गेलो तर दिसलं त्या बिचाऱ्या बाळाच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होत .आणि त्याच्या मागे एक भलीमोठी खोक पडली होती . इतकंच की त्याच्या केसांच्या आणि त्याच्या आईच्या काळ्या बुरख्या मुळे ते मला लगेच दिसलं नाही  मी अक्षरशः हललो. इतक्या सुंदर गोंडस बाळाच्या त्या किंचाळया माझ्या काळजाला छेदून जात होत्या. पण त्या वेदना फक्त मलाच जाणवल्या असतील बहुतेक करण तिकडचा प्रत्येकजण आपापल्या पेशंट जवळ होता त्याची काळजी घेत.खुशाल बघत होता मी त्या नर्स ला बोलावलं म्हटलं आमचं राहुद्या बाजूला आधी तिकडे बघा . त्या  नॉर्मल पणे तिथे गेल्या आणि फक्त त्यांनी साधारण नजर टाकून मला स सांगितलं "अजून डॉक्टर आलेले नाहीत" तुम्ही बसा बाहेर ,बघू .मला अत्यंत आश्चर्य वाटलं .मग मी त्याच्याजवळ गेलो तर एक पेच प्रसंग .. त्या आई ने मला डॉक्टर समजलं करण मी अगदी पांढरा शुभ्र शर्ट घालून परफॉर्म ला आलो होतो .ती चटकन म्हणली साब मेरे बच्चे को लगा है। कुछ करो ना ।  बापरे म्हटलं मी डॉक्टर नाहीये आता कस सांगू की अजून डॉक्टर आलेले नाहीयेत हे शब्दच मी सांगू शकलो नाही . त्याच रडणं सुरूच होत .आणि ते ऐकून एका आईच मन निश्चितच शांत नाही राहणार ती आई स्वतःला  आणि त्याला आवरत हुंदके देत त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत होती. ती जवळ जवळ बेशुद्ध पडली शेवटी मी माझ्या दोन हातांनी त्याला जवळ घेतलं आणि सगळं रक्त माझ्या तळहातांना लागलं माझे हात रक्ताने माखले. त्याच रडणं थांबतच नव्हतं तरीही त्या माऊली ने त्याला जवळ घेतलं .मग माझ्याकडे कौस्तुभ चा फोन होता चुकून आणलेला .मी तो लगेच उघडला आणि कार्टून लावलं .तरीही वेदना कमी नव्हत्या तेवढ्यात माझे मित्र मैत्रिणी  तिथे आले मग मी लगेच एकाला ला सांगितलं  लवकर एक  मोठं चॉकलेट घेऊन ये  दोघी मैत्रिणींना सांगितलं की त्याच्या आई जवळ थांबा .पण मी काहीच करू शकत नव्हतो नंतर चॉकलेट्स आणले पण त्या लहान जिवाच्या अक्रोशापुढे ते ही हतबल झाले मी हात धुतले तरीही डाग तसेच होते . त्या नर्स नि एक कापसाचा तुकडा दिलेला .
शेवटी डॉक्टर आले मी भेटलो आणि माझी ओळख दिली .म्हटलं आधी इकडे बघा मी भेटायला आत गेलो आणि ते सगळे बाहेर होते .बहुतेक तेवढ्यात त्यांचे नातेवाईक तिथे आले .आणि मी गर्दीतून बाहेर आलो  त्यांना बोलावण्यासाठी .आणि बघितलंतर ते कुठेच दिसत नाहीत मी बघितलं पण त्यांचा शोधच लागला नाही .डाँक्टर नि मला विचारलं कुठे आहे पेशंट.तेव्हा नर्स मॅडम स्मित हास्य करून म्हणाल्या बहुतेक बाहेर नेलं असेल त्यांनी नातेवाईक आले होते. विषय तिकडेच मोडला. आणि प्रत्येकजण आपल्या कामाला लागला .
    आता सर्वात मोठा विषय यात चूक कोणाची ? हो ना?  सरळ बोटं उठलं डॉक्टर वर आणि प्रशासनावर पण ही सगळी गम्मत वेळेची आहे. आता ही दुसरी बाजू बघूया . प्रत्येक जण म्हणाला असेल डॉक्टर चा निष्काळजी पणा पण खरं तर त्याची एक येण्याची वेळ ही ठरलेली असते आणि तो तर प्रामाणिकपणे त्याच्या वेळे नुसार आला .त्याने वेळ पाळली ना .काहीही असलं तरी आपल्या कामाच्या वेळेतच तो काम करणार ना.
दुसरा निशाणा आला असेल नर्स वर पण यात तिचं काय?  हॉस्पिटलमध्ये रोज हजारो पेशंट येतात कुणकुणाकडे लक्ष देणार शेवटी तिला सुद्धा वेळेवर घरी जायचं असतं ना !! त्यामुळे ड्युटी च्या वेळी ड्युटी नंतर घरी वेळ. 
यात उरलो मी आणि ती आई. जी तिच्या बाळाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी वणवण फिरत होती कारण ती वेळ  तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती .
आणि दुसरा मी जो कधीही वेळेचा विचार न करणारा आज वेळेशी गप्पा मारत होता.
सांगायचं इतकंच . आयुष्यात सगळे मला सांगतात की वेळ पाळत जा . पण अशी माणसचं माझ्या मनात थोडी दूषित झाली . कारण मला अशी वेळ पाळायची नाहीये . मला तर अशी वेळ कायम पाळायला आवडेल .जी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी गेल्यावर धीर आणेल. भावा वेळेवर आलास ,अशी वेळ जी सांगेल भावा त्या वेळी तू नसतास तर काय झालं असतं!!!  अशी वेळ मला त्या वेळी mam नि सांगितली शैल्या वेळेवर आलास  मला काही सुचत नव्हतं . अशी वेळ जी मला अपयशाच्या पायरीवर सांगते की तुझा ही एक दिवस आहे वेळेची वाट बघ. मी अशी वेळ नेहमी पाळतो .म्हणजे नशिबाने इतरांच्या आयुष्यात माझ्या रूपाने किव्वा इतर प्रकारे ती आपोआप पाळली जाते .फक्त मनाचं बॉंडिंग हवं .
आता काही जण अस देखील म्हणतील मग मग  वेळेवर यायची वेळ पाळायला नको का? मी म्हणेन पाळा ना  पण इतकी नका  की आपल्या वेळे पुढे इतरांच्या भावना दिसणार नाहीत . अशी माणसं फक्त रोबोट सारखी वेळ पाळतात आणि स्वतःला  प्रामाणिक म्हणतात . मित्रांनो काम तर होतचं राहत हो तुम्ही तशी वेळ नक्की पाळा पण मी फक्त ही वेळेची दुसरी बाजू दाखवली . कारण कुणावर कधी कशी  वेळ येईल सांगता येत नाही फक्त त्या क्षणी आपल्या पहिल्या बाजूचा वेळ बाजूला ठेऊनया दुसऱ्या बाजूचा वेळ दुसऱ्याला द्या . तो ही म्हणेल अगदी वेळेवर आलास !!!  मी ही वेळ कायम पाळतो या प्रसंगातून समाधान इतकंच वाटलं की ज्या माझ्या मित्राला नयन ला रक्ताची उलटी झाली तो सुखरूप आहे आणि त्याने मला पहिला मेसेज केला . दादा अशा वेळी तू होतास म्हणून मी ठीक आहे .असाच वेळोवेळी मदत करु. एवढं समाधान मला मिळाल बाकी घड्याळाचा गुलाम मी नाहीये !! धन्यवाद वेळात वेळ काढून माझा लेख वाचल्या बद्दल . वेळ मिळाला तर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा .

Sunday, May 26, 2019

जरा ऐका ना!!!

मित्रांनो मी आज एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं. ते म्हणजे लिखाणाच्या . खरंतर  मला प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू मांडायला आवडते. त्यामुळे मी यासाठी लेखन हे माध्यम निवडलं. त्यानुसार मी पाहिला लेख लिहिला .तो बऱ्याच अंशी लोकांना पटला ही असावा. पण हा तर फक्त अ होता. पुढे मला तर अखंड बाराखडी गिरवायची आहे .याची जबाबदारी सुद्धा मला आहे. म्हणून ही अशीच एक दुसरी बाजू पुन्हा एकदा मांडतोय. मित्रांनो आपलं आजूबाजूचं जग इतकं फास्ट झालंय की , बाजूच्या बारीक बाकीक गोष्टी सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. खरंतर चूक आपलीच आहे.दिसणार कसं? आपण प्रत्येक गोष्टीकडे धनाच्या चष्म्यातून बघतो. तोच चष्मा जर मनाचा असेल तर.या गोष्टी दिसतील.
सांगण्याचा उद्देश असा  की, आपल्याला एक खूप मोठी व्याधी जडलीये ती म्हणजे बहिरे पणाची कर्णबधिर पणाची . कारण आयुष्यात अशा काही गोष्टी असतात  ज्या आपल्याला कधी ऐकूच येत नाहीत . पण मी याच गोष्टी माझ्या दुसऱ्या  बाजूच्या गोष्टीने मांडतो माझी खात्री आहे की ही दुसरी बाजू तुम्हाला नक्की विचार करायला लावेल.
 माझ्या रोजच्या दिवसासारखा हा एक दिवस होता . मी नेहमीप्रमाणे कॉलेज ला जायला निघालो खरं तर आमचं कॉलेज 7.30 ला भरतं पण मी थोड्या उशिरा म्हणजे 11.30 ला गडाची पायरी सर करायचो . मी चालत चालत आमच्या कॉलेज जवळ आलो . तिथे काकांचा वडापाव ही एक फेमस जागा आहे. अर्थात तिथे  खाण्या साठी मुलांची गर्दी होती मला माझे काही मित्र तिथे भेटले आणि मी तिथे त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. माझ्या बाजूला कॉलेज मधली अजून सुद्धा मुलं होती . त्यांनी घाई घाईत खायला मागवलं आणि आणि ते मजा  मस्करी करत खात होते. आणि मी त्यांचं निरीक्षण करत होतो. आशा वेळी एक कुत्र्याचं कुपोषित पिल्लू तिथे आलं . ते त्यांच्याकडे ओशाळवण्या नजरेने पाहू लागलं. त्याची ती नजर आणि भुकेपाई गळणारी लाळ  मला खूप काही सांगणारी होती. ते त्यांच्या पायाखाली आलं . आणि त्यांच्याकडे पाहू लागल. पण त्यांच्यापैकी कुणीही त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही शेवटी बेल चा आवाज झाला आणि ती मूल खूप घाई गडबडीत जायला निघाली.त्यांनी ते खाणं अर्धच ठेवलं ते बॅग उचलून पळत गेले . प्लेट मध्ये खाणं तसंच होतं.  आणि त्यावर त्या बिचाऱ्या पिल्लाची नजर ही तशीच होती . शेवटी ती प्लेट त्या हॉटेलवल्याने उचलली  आणि तिथेच त्या पिल्लाची आशा संपली . ते पिल्लू एकटक बघतच राहिलं. हे आपल्या कर्णबधिर पणाच पाहिलं लक्षण . त्या पिल्लाची हाक त्यांना ऐकूच गेली नाही .त्याची तळमळ , भूक, आपल्या कर्णबधिर पणामुळे  कशी ऐकू येणार नाही का?  शेवटी मीच 5 रु .चा पार्लेजी घेतला आणि त्याच्यासमोर तो खजिना खुला केला.आणि मी तिथून निघालो .कारण लेक्चर माझंही होत.
        असंच नंतर कॉलेज चे सोपस्कार पार पाडले आणि घरचा  रास्ता धरला. मी चालत चालत स्टँड वर जायला निघालो . तिथे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने समोरूम एक बाबा आपल्या लहान  मुलाला घेऊन चालला होता. त्याच बाजूला शेजारी एक खेळण्याच दुकान होतं.  त्याच्या बाहेर असंख्य खेळणी लावली होती.  त्या लहान मुलांची नजर पटकन त्या खेळण्यावर गेली आणि ते मुलं .बाबाकडे हट्ट करू लागल. प्रत्येक पावलागणिक त्याचा हा हट्ट वाढत जात होता. बाबा मला हे हवंय मला द्या  म्हणून ते मुलं रडायला लागलं. जिवाच्या धडपडीने ते सांगायचा प्रयत्न करत होत.  पण नंतर आश्चर्याची गोष्ट अशी की .ते बाबा कुठलाही प्रतिसाद न देतो . त्याचा हात धरून पुढे चालत राहिले. जणू काही त्यांना काही ऐकूच गेलं नाही. तेव्हा ते सुद्धा कर्णबधिर झाले .असतील. कदाचित त्यांना परिस्थिती ने जबाबदारी ने कर्णबधिर केलं असावं.म्हणून त्यांना त्या जीवाची हाक ऐकू गेली नसेल. मला चटकन माझ्या वडिलांची आठवण झाली. माझ्या विचारांचं चक्र सुरू ठेवत मी   चालत राहिलो .नंतर घरी जाण्यासाठी बस पकडली. मी बस मधून जात होतो .मी खिडकीजवळ बसलो होतो . बस .jk फाईल TRP च्या पुढे आली.आणि पुढे ट्राफिक  मुळे थांबली . प्रचंड ऊन होत.त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती .  त्या कडक उन्हाच्या झळा सावरत माझी  नजर  खिडकीतून रस्त्याच्या कडेला कांद्याची पोटी विकणाऱ्या कुटुंबाकडे गेली आणि स्तब्ध झाली. तो माणूस आणि त्याची लहान मूल भर उन्हात डोक्यावर काहीही सावली नसतात .आपला माल विकतोय. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला विकत घेण्यासाठी विनवणी करतोय  पण आत्ता ही तेच त्याच्या समोरून फक्त माणस चालत होती .कुणीही त्याच्या हाकेला उत्तर दिलं नाही . इव्हन बघितलं सुद्धा नाही .कदाचित. त्याच्या कर्णबधिर कानांना ही हाक ऐकूच आली नसेल. प्रत्येक जण इकडे तिकडे विनाकारण हजारो रुपये उडवतो. पण त्याच 100 रु. च पोत विकत घेतल  तर टोमणे सुरू होतात. कशाला घेतलंस? खूप महाग आहे आता खराब झाले तर काय करायचं . हे सगळं ऐकल्यापेक्षा न एकूण पुढे गेलेलं बरं नाही का?  याच कर्णबधिर कानांना त्याची हाक ऐकू येणार आहे का!!!!
      शेवटी बस विचारांच्या प्रवाहात माझ्या स्टॉप जवळ पोहचली आणि मी उतरलो. उतरल्यावर घरी जाण्याआधी  म्हटलं थोडा वेळ झाडाखाली उभं राहूया!! मी स्टॉप वरच्या झाडाखाली बसून राहिलो.  त्याच्या बरोबर समोर काही दुकानं होती . आणि त्यातल्या एका दुकानासमोर  दोन बोकडाची लहान पिल्लं बांधली होती . ती मजेने चारा खात होती .आणि एकमेकांसोबत खूप प्रेमाने खेळत होती. ते बघून मलाही   गम्मत वाटली. पण नंतर  थोडी वर नजर गेल्यावर समजलं ते एक मटण सेंटर आहे. थोड्या वेळाने एक  माणूस त्यातून बाहेर आला आणि त्याची पावलं त्या दोन पिल्लांसमोर थांबली .त्याने त्यातल्या एकाची दोरी सोडली  आणि उचललं .  आणि काही कळायच्या आत तो माणूस त्याला आत घेऊन गेला.  एवढं बघून माझं मन पिळवटून निघालं. त्याच्या त्या ओरडण्याच्या हाका माझ्या मनाचे असंख्य तुकडे करणाऱ्या होत्या. शेवटी त्या माणसाने दरवाजा बंद केला . आणि मी माझे डोळे. त्याच्या ओरडण्याचा आवाज वाढत गेला  तो माझ्या कानांवर सारखा पडत होता.कारण माझे कान बंद नव्हते. शेवटी त्याच्या प्रचंड किंचाळीबरोबर त्याचा आवाज शांत झाला. मी जागे वरून उठलो. सगळं सुन्न झाले. शेवटी त्या खोलीतून एक रक्ताचा ओघळ वाहत वाहत  त्या दुसऱ्या पिल्लाच्या पायाशी आला.ते पिल्लू ही माझ्यासारख सुन्न झाल .आणि मनाविरुद्ध त्याने आणि मी कर्णबधिर पणाच सोंग घेतलं. पण ज्याने त्या लहान पिल्लाला निर्दयी पणे ओढत नेलं तो पहिला कर्णबधिर होता.कारण त्याने त्याच्या किंचाळ्या मनापासून ऐकल्या असत्या  तर कदाचित त्याच ही हृदय विरघळल असत. मी ही कर्णबधिर झालो. तेव्हा अस खूप वाटलं  पैसे देऊन त्याचा जीव मला वाचवता आला असता. पण माझा खिसा पार्लेजी चा पुडा घेऊन केव्हाच रिकामा झाला होता.मग मी ही कर्णबधीर होऊन माझा रस्ता धरला.
       मित्रांनो अजून काही बोलण्याची अवशकता नाहीये,  मी हा दिवस कधीही विसरू शकत नाही , पण ही दुसरी बाजू तुम्हाला नक्कीच समजली असेल ना!!!  प्रत्येकाला ही व्याधी जडली आहे. या हाका कुणाला ऐकूच जातनाहींत. कशा जाणार प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय .पण  कितीही धन मिळावा तुमचं मन जेव्हा  हाक ऐकेल ना तेव्हा  तुमच्या हृदयावर सुद्धा  एक हसणारी कळी खुलेल.  मित्रांनो तेव्हा आशा हाका ऐकलं ना.आपल्याला ही कर्णबधिरत्वाची व्याधी दूर करायची आहे.तेव्हा पहिली हाक आपल्या मनाला घाला .आणि हो।      " जरा ऐका ना" !!!!!

Sunday, May 19, 2019

"ती "ची ति पहिली वेळ...

                  ती " ची पहिली वेळ .......

खरं तर बऱ्याच कालखंडानंतर पाहिल्यांना लिखाणाचं शस्त्र हातात घेतलं . मग लिहिण्या आधी  प्रश्न पडला की नेमकं कशावर लिहायचं बरं ? विचार आला कॉलेज मधल्या प्रेमासाठी असुसलेल्या प्रेमवेड्या मुलांवर लिहावं ? आयुष्यापेक्षा मार्कंना सिरीयस घेणाऱ्या अभ्यासू मुलांबद्दल ?  मुलींपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या  कॅडबरीवर लिहावं की   आशा मुलींच्या एका साध्या लूक ने  ,हीच आपल्या आयुष्याची साथीदार आशा गोड भयंकर गैरसमजात  वावरणाऱ्या भोळ्या मित्रांवर . पण नंतर म्हटलं जरा वेगळी बाजू मांडुन बघूया . नाण्याची एक बाजू सगळेच बघतात पण लोक  दुसऱ्या बाजूने विचार करायला थोडा आळशी पणा करतात मला तीच दुसरी बाजू कायम सोप्या शब्दात मांडायला आवडते.
     मी FY ला आल्या पासून जेव्हा माझ्या मित्रांसोबत एकत्र असतो . तेव्हा 3 वर्षात  अनेकदा हा विषय येतो तो म्हणजे "ती "चा . आणि "ती " अशी नव्हती रे . खरं तर प्रत्येक भेटीत कुणाच्या ना कुणाच्या ओठावर हे वाक्य येतंच. चर्चेचा विषय पार IPL पासून सुरू होऊन हिरोशिमा नागासाकी पर्यंत जाऊन हिंडून आला तरी शेवटी येतो "ती" च्या वर. खरं तर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात "ती" चं महत्व अनन्य साधारण आहे.  तिच्या काळजी ने तो तिच्या पावित्र्याचे दाखले सगळ्यांसमोर देत असतो . हीच कदाचित मुलांमधली खंत असावी.  मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारतो . तेव्हा सगळे माझ्याकडे एक एक भयंकर असे प्रश्न घेऊन येतात , ते प्रश्न म्हणजे "ती" Fy ला कॉलेज ला आली तेव्हा खूप साधी होती अगदी कुणाशी बोलायची नाही ,नंतर इतकी कशी बदलली ? एवढी वाया कशी गेली ? तिची अक्कल कुठे गेलेली? त्याने तिची पूर्ण वाट लावली ! तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. असे प्रश्नांचे भडिमार होतात. मग या सगळ्यांना उत्तर देणे तर आपले परम कर्तव्य आहे. त्या शिवाय त्यांच्या  बिचारांच्या जीवाला शांतता कशी मिळणार?
  खरं पूर्वी पासून माझं आयुष्य रंगमंचाशीच  निगडित आहे. आणि माझे  बहुतांशी मित्र  सुद्धा याच क्षेत्रातले आहेत. याच्या मुळेच माझ्यासोबत  आहेत. मग म्हटलं एवढ्या गहन विषयाची उकल रंगमंचाच्या माध्यमातून करू नाही का!!  खरं तर कुठलीही मुलगी वाईट नसते पण तीच आजूबाजूचं वातावरण "ती"ला बदलायला भाग पाडत . हेही खरं.  याची उकल करताना पडदा उघडून रंगमंचाकडे वळू.
ज्याने त्याने आयुष्यात पहिल्यांदा स्टेज वर पाऊल ठेवलंय  त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे। की तुमचं पाहिलं सादरीकरण  होण्याच्या 5 मिनिटे आधी स्टेज वर पाउल ठेवण्या आधी तुमची मानसिकता कशी होती??  पोटात प्रचंड गोळा येत होता ना? खूप भीती वाटत होती हातपाय थरथरत होते? बापरे मी हे वाक्य चुकले तर लोक काय म्हणतील ? माझ्यावर हसतील का? असे प्रचंड प्रश्न येत होते ना? मग शेवटी स्टेज वर पाहिलं पाऊल पडतं . आणि सादरीकरण करताना सगळी ती भीती संपते . प्रयोग सुखरूप पार पडतो नंतर जीवाला खूप समाधान मिळतं. जीव शांत होतो . आता कणभर कॉन्फिडन्स अजून वाढलेला असतो .मग दुसऱ्या प्रयोगाची वेळ येते , त्यावेळी  सुद्धा पोटात गोळा येतो  , लोकांची भीती वाटते ।पहिल्या वेळी तर वाचलो दुसऱ्या वेळी आपण चुकलो तर ? पण पहिल्या वेळेपेक्षा  थोडी कमी भीती वाटते . मग तो ही प्रयोग यशस्वी होतो. त्यानंतर ही जीवाला आंतरिक समाधान मिळतं. मग तिसऱ्या प्रयोगाला तीच भीती कमी होते जगाची परवा तेव्हा कमी सतावते . पुढे जसजसे प्रयोग होत जातात तशी आपली भीती कमी कमी होत जाते. शेवटी अशी वेळ येते की दिग्दर्शकाला स्वतःहून सांगतो .चल रेडी आहे काय ते सुरू कर ।  बेल दे. आशा भीती आणि भावना शून्य अविर्भावात आपण चटकन बोलतो . तेव्हा काहीही वाटत नसत.शरीर फक्त मेकॅनिकली काम करत असत.  भावना बोथट होतात.
याचाच संदर्भ माझ्यामते "ती "च्या पहिल्या वेळेपासून जोडता येईल . ज्या व्यक्तीच्या आहारी ती गेलेली असते  त्याच तिच्या पेक्षा तिच्या शरीरावर जास्त प्रेम असत . आणि यातूनच तिची पहिली वेळ येते . तिला त्यावेळी प्रचंड भीती वाटते .लोकांची ,स्वतःची . अगदी मोठे विचार येतात ।मग मी प्रेग्नंट वैगेरे झाले तर? अस झालं तर तस झालं तर? पण नंतर प्रयोग सादर होतो.. हा प्रयोग तिच्या चारित्र्याशी केलेला असतो. त्यानंतर त्याला समाधान मिळतं.  मग ही मालिका पुढे सुरू होते ." ती" च्या दुसऱ्या वेळी सुद्धा तिला खूप भीती वाटत असते पण दिग्दर्शक हा चलाख पणे तिची समजूत काढण्यात यशस्वी होतो. आणि थोड्या कमी भीतीने दुसरा प्रयोग ही यशस्वी होतो .पुढे तिलाही याची सवय होते आवड निर्माण होते .शेवटी अशी वेळ येते की तिच्या भावना पूर्णपणे संपुष्टात येतात. उरत ते फक्त शरीर.तिला काहीही वाटत नाही . सारखा दिखाव्याचा मेक अप लावून  त्याच ही तेज कमी होत.यात मात्र विजयी झालेला असतो एक व्यक्ती तो म्हणजे "ती"ला पहिल्यांदाकाम करण्यासाठी  भाग पडणारा दिग्दर्शक .. शरीराचा उपभोग घेऊन भावनेचा खून करणारा  व्यक्ती. यही सब गेम चेंज करता है ।माझ्या या उदाहरणावरून सुज्ञ मुलांना नक्की  चांगल्या पद्धतीने समजण्यासारख आहे. गल्ली गल्लीतली फालतू नाटकं करण्यापेक्षा एकदाच आदर्श नटसम्राट करा. माझं नाटकावर प्रचंड प्रेम आहे. म्हणून या माध्यमातून मी हे उदाहरण दिलंय. यातुम त्याला कमी लेखण्याचा उद्देश नाही ।पण हे माध्यम मला दुसरी बाजू मांडण्यासाठी सक्षम वाटलं . आणि हे लिखाण संपूर्ण स्त्री विषयी नाहीये .फक्त"ती " च्या विषयी आहे. जी की तिच्या विषयी खूप तळमळ वाटते. " ती "च्या विषयी आहे तिची ही पहिली वेळ नको येऊ देत अस वाटत.माझं फक्त एकच सांगणं आहे आणि हे अत्यंत महत्वाच आहे.मुलींनो  नाटकात आणि आयुष्यात  दिग्दर्शकाला आणि प्रचंड महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाची निवड ही विचार करून करा. दिग्दर्शक आपली वाट लावू ही शकतो आणि दाखवू ही शकतो...मी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून काम करेन पण एक आदर्श वाट दाखवणारा "तो" दिग्दर्शक फक्त"ती"च्या साठी. त्यामुळे दिग्दर्शकचा विचार नक्की करा.